Friday, October 21, 2011

ईच्छाशक्ती .. The WillPower

काय असते हि नक्की म्हणजे नक्की कुठे असते आणि आहे कि नाही हे कसे ओळखायचे ? खरच खूप प्रश्न पडतात ना ?... पण हि गोष्ट ज्यांच्या जवळ असते ते ह्या जगातले सगळ्यात सुखी आणि श्रीमंत माणस असतात.
कस असा ? प्रश्न पडण स्वभावीकच आहे, हल्ली लोक थोडस काही तरी बिनसलं किंवा काही गोष्टी मनासारखी नाही झाली कि लगेचच डिप्रेस होतात, काहीना वाटू लागत कि संपल आता सगळ आणि तेच ते घोटत बसतात पण इथेच खरी परीक्षा सुरु होते ..
परवा अशीच घरी बसले होते आणि माझ्या काकूंची मैत्रीण आली, दुपारच होती..मी आपली निवांत पुस्तक वाचत झोपले होते त्या आल्या म्हणून उठून बसले,त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि बोलल्या काय ग तू कधी पासून पुस्तक वाचायला लागलीस? .. मी म्हटलं काही नाही,सध्या वेळच वेळ आहे. ओफीस मध्ये काही काम नाहीये आणि बाकी जे जे तरी करतेय ते पण काय ग्रेट होत नाहीये,वैताग आलाय .. सगळ्या गोष्टी माझ्या बाबतील घडतात,खरच कंटाळा आलाय मला सगळ्याचाच.सगळ माझ्याच बाबतीत बहुतेक देवानी प्लान करून ठेवलाय.
त्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि मला बोलल्या,तुम्ही आज कालची मुल इतक्या लवकर सगळ्या गोष्टीची कट कट कशी करून घेता, प्रत्येक गोष्टीचा त्रास तुम्हालाच आहे आस का वाटत तुम्हाला ? एवढ्या तरुण वयात लगेच गीवउप कस होता तुम्ही ? अख्खा आयुष्य पुढे उभ आहे आणि तुमच्याकडे कामतरता आहे ती विलपावर ची !
मी त्यांची कडे पाहताच बसले आणि मग मला कळली त्यांनी अनुभवलेली ती ३ वर्षे ...
त्यांना ३ वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता होता, एक असाध्य असा कॅन्सर.. सारकोमा
("http://en.wikipedia.org/wiki/Sarcoma"), हा एक पेशींचा कॅन्सर आहे शरीरातील कोणत्याही भागात हा मसलच्या आत पेशींमध्ये वाढतो. सारकोमा हा २ प्रकारचा असतो एक म्हंजे हाडान्माधला आणि दुसरा मसल मधला.त्यांना पायाच्या पोटरी मध्ये सारकोमा झाला होता.
पुण्यातील प्रत्येक स्पेशालीस्ट डॉक्टर ने त्यांना नाही संगीताल.वयाच्या ३५ ला अश्या प्रकारचा असाध्य रोग होणे हे एक वाईट नशीब नाही तर काय? त्या त्यांच्या भरलेल्या संसाराकडे पाहून त्या मरणयातना सहन करत होत्या. आस समजून कि हे जे काही शेवटचे दिवस आहेत ते तरी आपण आपल्या २ मुल आणि नवऱ्या बरोबर आनंदाने घालावूत. त्यांनी स्वताला घट्ट केल आणि काही न काही तरी पर्यंत करताच राहिल्या. वेगवेगळ्या डॉक्टर कडे जा, कोण कोण ला विचार,नेट वर माहिती मिळवणे तेवढ्यात त्यांना एका मुंबईच्या डॉक्टर चा पत्ता कळला, त्यांनी तिथे जावून दाखवून यायचं नक्की केल आणि त्या गेल्या... तिथे गेल्यावर त्यांना कळल कि त्यांचा कॅन्सर त्यांच्या त्या पायातील फक्त पोटरी पर्यंतच पसरलेला आहे आणि त्याच ऑपरेशन होण शक्य आहे,फक्त त्या ऑपरेशन मध्ये कदाचित पाय कापला जाण्याची शक्यता आहे. त्यांना नवी उमेद मिळाल्याने त्या ते करायला तयार झाल्या.पाय नसेल तरी मी माझ्या संसाराची गाडी नक्कीच कशीही पुढे ढकलू शकेल आस त्यांना वाटून गेल आणि त्यांनी डॉक्टरांना तसा पोसिटीव अतितूड ,विलपावर दाखवली, जी खरी अश्या प्रकारच्या उपचारासाठी आवश्यक असते आणि ते ऑपरेशन व्यवस्तीत पार पडले. सारकोमा फक्त पोटरी मध्ये असल्यामुळे त्यांचा पायाही शाबूत रोहिला फक्त पोटरी शिवाय.
त्यांनची इछाशक्ती जिंकली, त्यांनी मरणाला पण आपल्या इछाशक्ती ने दूर लोटले. आज ३ वर्षानंतरही त्या व्यवस्तीत सगळ करतात. कुठे कुठे फिरायला जातात, स्वताच्या पायावर उभ राहून सगळ करतात अगदी सामान्य माणूस करेल ते ...पण जर त्यानी त्या वेळेला त्यांनी गीवउप केल असत तर ? ..त्यांनी प्रयत्नच केले नसते आणि त्यांना कुठलाच उपाय दिसला नसता. तेव्हा इछाशक्ती हि अशी शक्ती आहे जी तुम्हाला कुठलेही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते. मला त्याचं हे सगळ ऐकून माझी लाज वाटली कि मी किती फालतू गोष्टीसाठी रडतेय.
आयुष्य हे एकदाच मिळत, पुढचा जन्म ..मागचा जन्म आस काहीच नसत. जे करायचं इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. त्यामुळे छान आनंदी राहा. आयुष्य छान जागा , स्वत हसा आणि दुसर्यानाही हसवा. कधीच कोणाला दुखवू नका. आणि सगळ्यात महत्तवाच कुठल्याही गोष्टी साठी "अशक्य" म्हणू नका.

Sunday, October 16, 2011

FTI - शोर्ट फिल्म्स फेस्टिवल ...

दोन दिवसा पूर्वी FTI मध्ये शोर्ट फिल्म्स फेस्टिवल झाला, मी गेले होते .. थोडा वेळ होता म्हणून त्यामुळे सगळे फिल्म्स नाही पाहू शकले पण जे काही पहिले त्यातले ३ फिल्म्स विचार करायला लावणाऱ्या होत्या .. पूर्ण दिवस मी त्या ३ गोष्टींवर विचार केला आणि काही जवळच्या लोकांबरोबर मी त्या फिल्म्सच विषयी बोललेही ..पण नंतर मात्र मी ते विसरून गेले ..
पण कालच त्या फेस्तीवलचा निकाल लागला आणि त्यात तेच फिल्म्स अव्वल ठरले जे मला विचार करायला लावणारे होते .. त्यातला एक होता २१२ ० fahrenheit, ज्यामधून दाखवलं गेल होत जर तापमान २१२ fahrenheit म्हणजे १०० degree ला गेले तर काय होईल .. लोक कधी एका पाण्याच्या बाटली साठी एकमेकांच्या जीवांवर उठतील आणि लोक पाणी मिळवण्या साठी काय काय करतील, कस bank चे लोकरहि पाण्यासाठी वापरतील कारण तेव्हा पाण्याला सोन्या पेक्षा जास्त किंमत असेल ... त्यामुळे तुम्हीही थोडा वेळ विचार करून बघा जर खरच पृथ्वीच तापमान १०० डेग्री गेल तर काय होऊ शकेल ?
दुसरा विषय होता कमीत कमीत वेळेत पैसे मिळवण्याच्या मागे धावण्याने लोक कसे स्वताच्या तोंडावर पडतात ..त्यासाठी त्यांनी दाखवलेलं उदाहरण पण छानच होत, नाव होत वर्तुळ ..एक छोट खेड .. आणि त्यातलं एक गरीब कुटुंब ..एक लहान मुलगा .. ज्याची आई त्याला पुरणपोळी साठी गुळ आणायला पाठवते आणि त्याला जाताना २ रुपये देते .. मग त्याला कसे मित्र भेटतात आणि त्याला अनेक मोह होतात पण तो स्वताच्या मनावर ताबा मिळवतो पण पुढे जावून आपल्या मित्राला मिळालेल्या अचानक पैश्यातून तो मोहात पडतो आणि आपले असलेले २ रुपये पैसे लावून खेळणाऱ्या मुलांबरोबर खेळतो आणि पैसे जातात पण हातात काहीच येत नाही म्हणजे २ रुपये पण नाहीत आणि गूळही नाही ...
तिसरी फिल्म होती दोन म्हातारपणाच्या उंबर्थ्याकडे पोहचलेले जोडपे ... ज्यातलं एक माणूस जग सोडून लवकरच जाणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे मरणा विषयीचे बोलणे ... विषय थोडा जड होता आणि संवाद हि मला बरेच जड वाटले पण विषय चांगला हाताळला होता ... ह्या फिल्म च नाव होत थे Gateway of Heaven ! ...
नवीन शिकणारे लहान लहान लोक किती छान फिल्म्स बनवतात हेच अश्या प्रकारच्या फेस्टिवल मधून बघता येत आणि त्यांची छान पारख करता येते... कदाचित ह्यातूनच कोणी तरी पुढे जावून नसरुद्दिन शहा,जाया बाधूरी किवा स्मिता पाटील,नाना पाटेकर,आणि आताच रोहित शेट्टी ... बनतील आणि आपली करमणूक करतील .

Monday, October 10, 2011

‘गझलसम्राट’ काळाच्या पडद्याआड ...




सगळ्या गझल प्रेमीना अतिशय दुखद घटना. मी अस हि काही ऐकल होत कि जी लोक दारू पीत नाहीत त्यांना जगजीतजिच्या गझलने नशा चढायची आणि नेहेमीच चढत राहील ह्यात काहीच वाद नाही. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने त्यांच्याच गझल ऐकवून स्वताच्या प्रियकर व प्रेयसीला खुश केले असेल. आता ह्या पुढे नवीन गझलचा रूपाने काहीच ह्या लोकांना मिळणार नाही पण त्यांची एक आणि एक गझल अजरामर राहील .. थोडक्यात गझल गायीकी ते गेल्याने अनाथ झाली.

गझलला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यात त्यांच मोठं योगदान होतं. जगजीत सिहं यांनी ५० पेक्षाही जास्त अलबममध्ये गाणं गायलं आहे आणि त्याचं गझलांचं प्रमाण जास्त आहे.
तुमको देखा तो ये खयाल आया, होठों सेछुलो तुम मेरा गीत अमर कर दो, वो कागज कश्ती वो बारिश का पानी यांसारख्या गझल फारच लोकप्रिय होत्या.

तुम इतना जो मुस्कारा रहे हो (अर्थ), चिठ्ठी न कोई संदेस (दुश्मन), होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है (सरफरोश), हाथ छुटे तो रिश्ते नही छोडा करते (ट्रफिक सिग्नल) यांसारख्या त्यांच्या अनेक गझल चित्रपटांमधून ऐकायला मिळाल्या.

पण आज फिर आखे नम सी हे ....

Sunday, October 9, 2011

विसरलास का सोडवायचेत अजून तुला खूप सारी कोडी .. ?




एक चूक आयुष्यातील, पुरते आयुष्यभर
कारण हजार कोडी टाकून जाते, हसून जीवनभर

एक कोड संपल कि दुसर उभ राहत
आणि सोडवत सोडवत, झालेल्या चुकेची आठवण करून देत

मन मारत मारत पुढे जाताना वाटत
करता येईल का ? मला माझ्या आयुष्यात एक तरी अंडू

ह्याच उत्तर माहित असत
म्हणूनच, जगत जातो करत पुन्हा पुन्हा रीडू

कधी वाटत झाल, संपली सगळी कोडी आता जगू मनावाणी
तेवढ्याच मन म्हणत अररे .. विसरलास का सोडवायचेत अजून तुला खूप सारी कोडी

पूर्ण जीवनाच्या चुकामुकीला तेवढ एकच निमित्त पुरत
झालेल्या भूल चुकीला खाकोत्याला बांधत

त्यातूनच शिकत शिकत जगावं लागत
केलेल्या प्रमादाने जगच भूल भुलैया दिसू लागत

आणि लोक कितीही चुकलेली असली तरी आपलीच भूल जाणवून देतात
कारण, आपले जवळचेही हसत हसत त्यांच्यात सामील होतात